सकाळी ७.३० वाजता पपु काकांनी आम्हाला गाढ झोपेतून उठवले, कसेबसे उठ्लोही. घाई घाईतच ब्रश, तोंड धुऊन फ्रेश झालो. सामानाची आवरा आवर केली. आता आम्हाला माचीवरील हॉटेल मध्ये नाश्ता करून खाली ठाकूरवाडीला जायचे होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण बरेच ओलमय झाले होते. हिरवा रंग अधिक गडद झाला होता. ओढे दुधाडी भरून वाहत होते. धुक्यानी गडांचा माथा ताब्यात घेतला होता. धबधबे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले होते. इकडे आमचे पाय खूपच जड जड वाटत होते. शनिवारच्या प्रबळ पायपीटामुळे चालणे मुश्किल झाले होते. शेवरीच्या काठीवर संपूर्ण शरीराचा भार टाकत चालत होतो. तरीही मोहीम यशस्वी झाल्याची ख़ुशी सर्वांनाच होती. १० मिनिटांनी हॉटेलवर पोहचलो. गरमा गरम कांदेपोहे पोटात टाकले, गवतीची चहा चा आस्वाद घेतला. एकदम कडक चहा. निलेशच्या भावाला २ दिवसांच्या त्यांच्या या सेवेचे मानधन दिले, निरोप घेतला आणि हो त्यांच्या बरोबर आठवण म्हणून फोटो हि काढला. (निलेशचे आई व वडील.… 'त्या हॉटेलचे मालक') भ प्रबळमाचीचे अविस्मरणीय रूप मनात साठवून, परत येथे नक्की येण्याच्या आणाभाका करत माची